२० दिवसांच बाळ आयसीयुमध्ये, पालकांची ही चुकी भोवली

नुकतच जन्माला आलेल्या बाळाची रोगप्रतिकारक शक्ती खूप कमी असते. त्या बाळाला लगेचच संसर्ग होण्याचा धोका असतो. नुकतच एक प्रकरण समोर आलं आहे, ज्यात फक्त २० दिवसांच्या चिमुकलीला आयसीयुमध्ये दाखल करण्याची वेळ आली. या निष्पाप बाळाची प्रकृती अचानक खराब झाली. त्यामुळे उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आली.

डॉक्टर पवन मांडविया यांनी इन्स्टाग्रामवर एका व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात या घटनेबद्दल सांगितलं आहे. त्यासोबत प्रत्येक पालकांसाठी महत्त्वाची सुचना केली आहे. कारण या निष्पाप बाळाला आयसीयूमध्ये दाखल करण्याची वेळ तिच्या पालकांच्या चुकीमुळे आली आहे.

डॉ. पवन मांडवीय सांगितलं की, अलिकडेच एका पालकाने त्यांच्या 20 दिवसांच्या नवजात बाळाला आपत्कालीन कक्षात आणले. बाळाची तपासणी केली असता त्याला सर्दी, खोकला आणि न्यूमोनिया झाल्याचं निष्पण झालं. बाळाची प्रकृती अशी होती की त्याला आयसीयूमध्ये दाखल करावे लागले. कुटुंबाशी बोलले असता असे आढळून आले की, आपल्या भारतीय समाजात ज्याप्रमाणे बाळाच्या जन्मानंतर नातेवाईक आणि मित्र त्याला पाहिला येतात. त्याचप्रमाणे त्या नवजात बाळाला भेटण्यासाठी अनेक लोक एकत्र आले होते.डॉ. पवन मांडवीय म्हणतात की, अनेकदा असे दिसून येते की, जेव्हा घरात एखादा छोटा पाहुणा येतो तेव्हा नातेवाईक आणि मित्र त्याला भेटण्यासाठी गर्दी करतात. या काळात बरेच लोक मुलाला आपल्या मांडीवर घेतात, काहीजण त्याला खायला घालतात आणि अनेक वेळा प्रेमाने गालावर चुंबनही घेतात.डॉक्टरांचे म्हणणे आहे की, अशा परिस्थितीत जर त्यापैकी कोणालाही सर्दी, खोकला, फ्लू किंवा विषाणूजन्य संसर्ग झाला तर ते मुलासाठी खूप धोकादायक ठरू शकते. डॉ. पवन स्पष्ट करतात की अशा संसर्गांशी लढण्यासाठी आवश्यक असलेली प्रतिकारशक्ती मोठ्या मुलांमध्ये किंवा प्रौढांमध्ये आधीच विकसित झालेली असते, पण नवजात किंवा लहान मुलांमध्ये ती पूर्णपणे विकसित झालेली नसते.

आता अशा परिस्थितीत, जर एखाद्या व्यक्तीला विषाणूचा संसर्ग झाला असेल आणि तो मुलाच्या जवळ आला किंवा त्याचे चुंबन घेतले तर हा संसर्ग मुलापर्यंत पोहोचू शकतो. यामुळे मुलामध्ये सर्दी, खोकला किंवा अगदी न्यूमोनिया देखील होऊ शकतो. डॉक्टर म्हणतात, ‘मला समजते की आपल्या भारतीय समाजात, जर एखाद्या नातेवाईकाला मुलापासून दूर राहण्यास किंवा त्याचे चुंबन घेऊ नये असे सांगितले तर त्याला वाईट वाटू शकते. पण आपण हे विसरू नये की आपल्या मुलाची सुरक्षितता ही आपली पहिली प्राथमिकता असली पाहिजे.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here