दिशा सालियन प्रकरणाबाबत आदित्य ठाकरेंची रोखठोक मुलाखत! वाचा काय म्हणाले?

माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी बीबीसी मराठीला नुकतीच मुलाखत दिली. यात त्यांना दिशा सालियन प्रकरणावर प्रश्न विचारण्यात आले. यावर त्यांनी उत्तरं दिली आहात. दिशा सालियन प्रकरणावर सार्वजनिक व्यासपीठावर बोलणार आहात की नाही? असा प्रश्न आदित्य ठाकरेंना विचारण्यात आला. त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले, “गेली पाच वर्षे ते बदनामी करत आहेत. अबू आझमी झालं, औरंगजेब झालं. आदित्य दोन सेशनमध्ये आठवला नव्हता, तो आता आठवला. करू देत त्यांना बदनामी.”

दिशा सालियनला ओळखत होतात का? असं विचारल्यावर आदित्य ठाकरे म्हणाले, “मी ही तुम्हाला हेच सांगतोय, मी याबाबत कोर्टातच बोलेन. ज्या विषयाशी दूरदूरचा संबंध नाही, त्यात का बोलायचं? जे बदनामी करतात त्यांना पगारच बदनामीचा मिळतो. दिशा सालियनसंदर्भात ज्या बातम्या आल्यात त्या खालच्या कमेंट बघा. त्यांना सत्य माहितेय. निवडणुका आल्या आहे, त्यामुळे बदनामी सुरू आहे, असं सर्वजण म्हणत आहेत. त्यामुळे मी अशा आरोपांना उत्तर देणार नाही. अशा आरोपांना मी कचऱ्याच्या टोपलीत टाकतो.”

“आरोप करणारे लोक पुढचे ५० वर्षेही आरोपच करत राहतील. आधीही ते माझ्या कुटुंबावर आरोप करत आले आहेत. त्यांना वाटतं आरोप केल्याने मी शांत बसेन. गेल्या पाच वर्षांत त्यांनी आरोप केलेत आणि मी शांत बसलोय, असा एकतरी क्षण तुम्ही मला दाखवा. यांच्या भ्रष्टाचाराचे कपडे रोज फाडतो म्हणून हे बदनामीचे प्रयत्न करत आहे. असे प्रयत्न देशभरात झाले. मला पप्पू म्हणण्याचा प्रयत्न झाला, पप्पू २ म्हणण्याचा प्रयत्न झाला. पण मी उत्तर दिलं होतं की दोन पप्पूंनी सळो की पळो करून सोडलं होतं”, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी आरोप करणाऱ्यांना रोखठोक उत्तर दिलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here