गैरहजर विद्यार्थ्यांच्या पालकांना जाणार एसएमएस, शालेय शिक्षण विभागाचा निर्णय

शालेय शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने नव्या आदेशाची अंमलबजावणी राज्यातील सर्व शाळांमध्ये होणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती, शाळेतील सुरक्षा व्यवस्था तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पार्श्वभूमीची पडताळणी यांसारख्या महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश आहे.

दिवसभरात विद्याथ्यांची तीन वेळा हजेरी घेतली जाणार आहे. गैरहजर असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना तत्काळ एसएमएस पाठवण्यात येणार आहे. प्रत्येक शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य असणार असून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याऱ्यांसाठी चारित्र्य प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. तसंच, विद्यार्थ्यांमध्ये मानसिक तणाव निर्माण होऊ नये म्हणून समुपदेशक नेमण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here