आदित्य ठाकरे पावसाळ्यात जेलची वारी करू शकतात: नितेश राणे

उद्धव ठाकरेंचा मुलगा पावसाळ्यात जेलची वारी करू शकतो, असं धक्कादायक विधान राज्याचे मत्यविकास आणि बंदरे मंत्रालयाचे मंत्री नितेश राणेंनी केलं आहे. मिठी नदीच्या गाळ सफाई घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने डिनो मोरीआची चौकशी सुरु केली असल्याच्या प्रकरणावरून नितेश राणेंनी पुन्हा एकदा ठाकरे कुटुंबावर हल्लाबोल केला आहे.

डिनो मोरीआच्या घरी परवा मुंबईच्या मिठी नदी गाळ गैरव्यवहार प्रकरणी ईडीच्या टीमने छापेमारी केली. मुंबईत विविध ठिकाणी ईडीची छापेमारी सुरू आहे. आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवलेल्या गुन्ह्याच्या आधारावर ईडीनेही स्वतंत्र गुन्हा नोंदवत तपासाला सुरूवात केली आहे. आतापर्यंत ईडीने कंत्राट देण्यात आलेल्या कंपनीशी संबधित लोकांचे या प्रकरणी जबाब नोंदवले होते. या माहितीच्या आधारे ही छापेमारी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

डिनो मोरीआ प्रकरणावरून नितेश राणेंनी पुन्हा एकदा ठाकरे कुटुंबाला टार्गेट केले. “उद्धव ठाकरे यांचा मुलगा पावसाळ्यात जेलची वारी करू शकतो” असं म्हणत मंत्री नितेश राणेंनी आदित्य ठाकरे यांच्या अटकेचे संकेत दिले आहेत. “डिनो मोरीआ प्रकरणात होणाऱ्या कारवाया आणि प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठीच एकत्रीकरणाची चर्चा आहे,” असंही राणे म्हणालेत. “डिनो मोरीआ प्रकरणात उद्धव ठाकरे यांचा मुलगा जेलची वारी करू शकतो अशी माहिती आहे,” असा मोठा दावा नितेश राणेंनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here