राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवारांनी ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. तर दुसरीकडे त्यांनी उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं आहे.
पत्रकारांनी शरद पवारांना सध्या राज्याच्या राजकारणामध्ये चांगलाच चर्चेत असलेला ठाकरे बंधुंच्या दोन्ही सेनांच्या संभाव्य युतीबद्दल प्रश्न विचारला. राज ठाकरे – उद्धव ठाकरे एकत्र आले तर मुंबई महानगर पालिकेत काय परिस्थिती असेल? असं शरद पवारांना विचारण्यात आलं. यावर शरद पवारांनी “आता पर्यंतचा माझा अनुभव असा आहे की राज ठाकरेंच्या सभाना गर्दी होते मात्र त्यांना मतं मिळत नाहीत,” असं विधान केलं.
मात्र त्याचवेळेस युतीमधील दुसरे ठाकरे म्हणजेच महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख असलेल्या उद्धव यांचं कौतुक शरद पवारांनी केलं. राज यांच्या तुलनेत उद्धव यांना मतांमध्ये परिवर्तन करण्यात अधी यश येतं असं विधान पवारांनी केलं आहे.