एका शंकेने वाढले दिवा-मुंब्रा अपघाताचे गूढ

मुंब्रा रेल्वे अपघातात धक्कादायक ट्विस्ट आला आहे. एका शंकेमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. यामुळे ४ जाणांचा मृत्यू नेमका झाला तरी कसा या प्रश्नाचे गुढ वाढले आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी माहिती दिली. घडलेल्या घटनेचा तपास सुरू आहे. नक्की कारण अजून समोर आले नाही. CCTV फुटेज तपासले जात आहेत. ज्या लोकमधून प्रवासी पडले त्या लोकल मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची आमची चर्चा सुरु आहे. प्रत्यक्षदर्शींनी चर्चा करुन नेमकं काय घडलं हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी सांगितले.

या रेल्वे अपघाताचे नेमके कारण अजूनही गुलदस्त्यात आहे. ज्या लोकलमध्ये दुर्घटना घडली त्या लोकल मध्ये एक व्यक्तीला उलटी येत होती. रेल्वेत भांडण सुरू होते. असे त्या ट्रेन मध्ये प्रवास करणारे प्रवासी सांगत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. भांडणामुळे तर हा अपघात झाला नाही ना अशी शंका उपस्थित केली जात आहे. यामुळे ज्या डब्यातून प्रवासी खाली पडले त्या डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी दिलेली माहिती ही या अपघातातील अत्यंत महत्वाचा पुरावा ठरणार असून अपघात नेमका कसा झाला याचा उलगडा होण्यास मदत करेल. मात्र. प्रत्यक्षदर्शींनी दिलेली ठोस कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here