बदलापूर शहरातील वाढत चाललेला वाहतूक कोंडीचा प्रश्न लवकरच सुटणार आहे. कारण बदलापुरात २ नव्या उड्डाणपूलांसह रेल्वे मार्गाला समांतर पूल आणि सॅटिस प्रकल्प होणार आहे. हे प्रकल्प लवकरात लवकर व्हावेत, यासाठी भाजप आमदार किसन कथोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पदाधिकाऱ्यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी इतरही अनेक प्रकल्पांबाबत मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आमदार किसन कथोरे यांनी दिली आहे.
बदलापूर शहरातील कात्रप परिसरात तसंच बॅरेज रोडवरील डीमार्ट ते खरवई परिसरातील होप इंडिया कंपनीपर्यंत असे २ नवे उड्डाणपूल उभारण्यात येणार असून बेलवलीतील दत्त चौक ते बॅरेज रोडवरील समर्थ चौकापर्यंत रेल्वे मार्गाला समांतर पूल बांधण्यात येणार आहे. यासोबतच बदलापूर रेल्वे स्थानक परिसरात सॅटिस प्रकल्प उभारला जाणार आहे.