मुंबई आणि लगतच्या शहरांमध्ये मुसळधार पाऊस पडतोय. सखल भागात पाणी साचल्याने वाहतूक कोंडीही झालीय. उपनगरीय रेल्वे तसेच मेट्रो रेल्वे सेवा विस्कळीत झाल्या आहेत. मुंबईत २४ तासांत म्हणजेच सकाळी ८ वाजेपर्यंत सरासरी ९५ मिमी पाऊस पडल्याची महिती समोर येतेय. १ जूनपासून मुसळधार पावसामुळे १८ जणांचा मृत्यू झालाय तर ६५ जण जखमी झाले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) पुढील २४ तासांत शहर आणि उपनगरांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. नंतर आयएमडीने मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ‘ऑरेंज’ अलर्ट जारी केला आणि सोमवारी रायगडसाठी ‘रेड’ अलर्ट जारी केला.
पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये 58 आणि 75 मिमी पाऊस पडला. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) पुढील 24 तासांत शहर आणि उपनगरांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. नंतर आयएमडीने मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ‘ऑरेंज’ अलर्ट जारी केला आणि सोमवारी रायगडसाठी ‘रेड’ अलर्ट जारी केला. दुपारी 3.31 वाजता 4.21 मीटर उंचीची भरती येण्याची शक्यता होती, त्यानंतर मंगळवारी पहाटे 3.31 वाजता 3.44 मीटर उंचीची भरती येण्याची शक्यता होती. रात्री 9.41 वाजता 1.86 मीटर उंचीची कमी भरती येईल. तर मंगळवारी सकाळी 9.10 वाजता 1.33 मीटर उंचीची कमी भरती येण्याचा अंदाज आहे.