आपल्या सुमधुर आवाजाने गेली आठ दशकं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या पद्मविभूषण आशा भोसले आपल्या स्पष्ट विधानांमुळे नेहमी चर्चेत असतात. दोन वर्षांपुर्वी तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला होता. यादरम्यान आशा भोसले एकनाथ, शिंदे, आशिष शेलार, राज ठाकरे यांच्यासोबत मंचावर दिसल्या. सध्या राज्यात हिंदीसक्तीवरुन वातावरण तापलं असताना आशा भोसले यांना त्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी दिलेल्या प्रश्नाची सध्या चर्चा रंगली आहे.
‘राजकारणात मी फक्त आशिष शेलार यांना ओळखत असल्याचं आशा भोसले यांनी उत्तर देताना म्हटलंय. पत्रकारांनी राज, उद्धव ठाकरे यांच्यावर विचारलेल्या प्रश्नांवर आशा भोसले यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.