मनसेवर टीका करताना अबू आझमी पुन्हा बरळले

मनसेवर टीका करताना समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी मराठीचा मुद्दा हा काय मुद्दा आहे का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. मनसेचे नेते मराठीच्या मुद्द्यावरुन जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मराठीचा सन्मान करा मात्र हिंदीचा अपमान करु नका असंही ते यावेळी म्हणाले आहेत. सोलापूरमध्ये पत्रकारांशी बोलाताना त्यांनी हे विधान केलं आहे.

राज आणि उद्धव एकत्र येण्यावर ते म्हणाले, एकाच घरात जन्माला आले असतील तर एक साथ राहो त्यात आम्हालाही आनंद आहे. राज ठाकरेंची काही ताकद नाही ते फक्त द्वेशाच राजकारण करतात. राज ठाकरे हे दररोज हिंदी किंवा उत्तर भारतीय विरोधात, मराठी आणि हिंदी विरोधात बोलणे हाच त्यांचा धंदा आहे. राज उद्धव एकत्र आले तर शिवसेनेची ताकद कमी होऊ शकते असा दावा आबू आझमी यांनी केला आहे.

संसदेत एक कमिटी आहे. भाषेच्या नावावर ४५ मेंबर आहेत ते भारतभर जाऊन हिंदीतून काम करण्यासाठी प्रोत्साहित करतात. केंद्र सरकारचे पूर्ण काम हिंदीतून असतं. महाराष्ट्रात जर तीन भाषा असतील तर सगळ्यात पहिल्यांदी मराठी असली पाहिजे. दुसरी भाषा हिंदी आणि त्यानंतर इंग्लिश असायला पाहिजे. महाराष्ट्र जर तिसरी भाषा हिंदी नसेल तर तुम्हीच सांगा कोणती भाषा पाहिजे? असा प्रश्न त्यांनी विचारला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here