अ‍ॅक्शन चित्रपट फ्लॉप ठरला तर आता कॉमेडीकडे वळला रोहित शेट्टी

बॉलिवूडचा अ‍ॅक्शन दिग्दर्शक रोहित शेट्टी याची अ‍ॅक्शन फ्रँचायझी ‘सिंघम’ ही नेहमीच प्रेक्षकांमध्ये उत्साह निर्माण करणारी ठरली आहे. मात्र २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सिंघम अगेन’ या बहुचर्चित चित्रपटाने अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत. जवळपास ३५० कोटींच्या बजेटमध्ये बनवलेला हा मेगाप्रोजेक्ट फ्लॉप ठरला. ‘सिंघम अगेन’ने भारतात फक्त २४२.७१ कोटींची कमाई केली. या चित्रपटात अजय देवगनसोबत अक्षय कुमार, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, अर्जुन कपूर, करीना कपूर, टायगर श्रॉफ आणि जॅकी श्रॉफ होते. ‘सिंघम अगेन’मध्ये ‘सुर्यवंशी’ आणि ‘सिम्बा’ या चित्रपटातील मुख्य पात्र म्हणजेच संग्राम भालेराव आणि वीर सुर्यवंशी देखील या सिनेमामध्ये एकत्र आले तरीही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करु शकला नाही.

या चित्रपटांच्या अपयशामुळे रोहित शेट्टीने अ‍ॅक्शन चित्रपटांपासून थोडा ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. एका मुलाखतीत त्याने सांगितले की, ‘सध्या मी अ‍ॅक्शनऐवजी कॉमेडी चित्रपट घेऊन परत येणार आहे.’ रोहित आणि अजय देवगण पुन्हा एकदा ‘गोलमाल 5’ साठी एकत्र येत आहेत. ही कॉमेडी फ्रँचायझी गेल्या दोन दशकांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here