बंगळुरू चेंगराचेंगरीनंतर बीसीसीआयने नवीन नियम जाहीर केले आहेत. एका रिपोर्टनुसार बीसीसीआय सचिव देबजीत सैकियाने स्पष्ट केले की, हे नियम आयपीएलनंतर विजयोत्सव साजरा करणाऱ्या सर्व संघांसाठी बंधनकारक असतील. सैकियाने पहिले हे स्पष्ट केले की बीसीसीआय अशा कार्यक्रमांच्या आयोजनाविषयी प्रोटोकॉल लागू करण्याचा विचार करत आहेत. सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचा मसुदा तयार करण्यासाठी आणि त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी मंडळाने तीन -सदस्यांची समिती स्थापन केली.
सैकिया म्हणाले, “हे आरसीबीचे खासगी प्रकरण होते, परंतु बीसीसीआयमधील भारतातील क्रिकेटसाठी आम्ही जबाबदार आहोत आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याची यासाठी आम्ही प्रयत्न करू’.
बीसीसीआयचे नियम
1. ट्रॉफी जिंकल्यावर 3 ते 4 दिवसांमध्ये कोणताही संघ विजयोत्सवाचे आयोजन करू शकणार नाही.
2. त्वरित आणि कार्यक्रमाचे खराब व्यवस्थापन टाळण्याची कोणत्याही कार्यक्रमाला लगेचच परवानगी दिली जाणार नाही.
3. बीसीसीआयकडून लेखी परवानगीशिवाय कोणताही कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकत नाही.
4. कार्यक्रमाच्या आयोजनापूर्वी बीसीसीआयकडून औपचारिक परवानगी घ्यावी लागेल.
5. 4 ते 5-स्तरीय सुरक्षा प्रोटोकॉल अनिवार्य असतील.
6. सर्व ठिकाणी आणि रहदारी दरम्यान बहु-स्तरीय सुरक्षा उपस्थिती आवश्यक असेल.
7. सुरक्षायंत्रणेत विमानतळापासून कार्यक्रमस्थळापर्यंत संघाच्या हालचालीचा समावेश करावा लागेल.
8. कार्यक्रमाच्या वेळापत्रकात खेळाडू आणि कर्मचार्यांची संपूर्ण सुरक्षा सुनिश्चित करणे.
9. जिल्हा पोलीस, राज्य सरकार आणि स्थानिय अधिकाऱ्यांकडून परवानगी घेणं गरजेचं आहे.
10. सर्व कार्यक्रमांना कायद्यानुसार आणि सुरक्षित रूपाने पुढे नेण्यासाठी नागरिक आणि कायद्याची अंमलबजावणी करणार्या संस्थांनी मंजूर घेणे आवश्यक आहे.