लाडक्या बहिणीसाठी पुन्हा एकदा आदिवासी विभागाचा ३३५ कोटी ७० लाखांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. यावरून लाडक्या बहिणीसाठी आदिवासी विभागाचा निधी वळवला असा आरोप विरोधकांकडून सरकारवर करण्यात येतोय. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस हे परभणी येथील कृषी विद्यापीठात तीन दिवशीय जॉईंट ऍग्रोस्को कार्यक्रमाला उपस्थितीत होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी विरोधकांकडून होणाऱ्या आरोपावर उत्तर दिले. म्हणाले की, जो काही आरोप आहे, तो खोटा आहे. अतिशय चुकीचा आहे. अर्थसंकल्प ज्यांना समजत नाही अशी मंडळीच असा आरोप करु शकतात. नियम असा आहे की, आपल्या अर्थसंकल्पनेत आदिवासी लोकसंख्या आणि अनुसुचित जमातीच्या लोकसंख्येप्रमाणे निधी राखीव ठेवावा लागतो. हा निधी राखून ठेवताना त्यातील जास्त जास्त निधी हा व्यक्तिक लाभाच्या योजनेसाठी राखीव ठेवला पाहिजे. आणि काही निधी खास विकासकामांसाठी ठेवला पाहिजे. आता लाडकी बहीण ही योजना व्यक्तिक लाभाची योजना आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना निधी दिला जो व्यक्तिक निधातून दिल्यामुळे तो आदिवासी विभागात दाखवावा लागेल.’