मालेगाव निकालावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

xr:d:DAFFuQ1RO2w:174,j:30841316958,t:22071516

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत कोर्टाच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘दहशतवाद ना कधी भगवा होता, ना आहे आणि ना राहणार,’ (आतंकवाद भगवा न कभी था, ना है, ना कभी रहेगा!) असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

नाशिकच्या मालेगावमधील बॉम्बस्फोट खटल्याप्रकरणी विशेष एनआयने कोर्टाने निकाल दिला असून, सर्व 7 आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. तब्बल 17 वर्षांनंतर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी निकाल लागला असून, कोर्टाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह, कर्नल पुरोहित, सेवानिवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर , सुधाकर द्विवेदी , सुधाकर चतुर्वेदी, समीर कुलकर्णी या सातही आरोपींना दोषमुक्त करण्यात आलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here