भारताचा जलदगती गोलंदाज ईशांत शर्माला मागील 4 वर्षांपासून भारतीय संघातून खेळण्याची संधी मिळत नाही आहे. मनात आशेचा किरण असल्याने ईशांत शर्माने अद्याप निवृत्ती जाहीर केलेली नाही. सध्याची स्थिती पाहता त्याचं संघात पुनरागमन होणं अशक्य दिसत आहे. ईशांत शर्मा आता ३६ वर्षांचा असून, निवड समितीही आता त्याला विसरली असेल.
ईशांत शर्माकडे आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाजीसाठी आता जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, आकाशदीप आणि अर्शदीप सिंगसारखे यांच्यासारखे पर्याय आहेत. याशिवाय नितीश रेड्डी आणि शार्दुल ठाकूर यांचेही अष्टपैलू खेळाडू म्हणून मजबूत दावे आहेत. म्हणूनच निवडकर्त्यांनी ईशांत शर्माला दुधातील माशी झटकल्याप्रमाणे भारतीय संघातून वगळलं आहे.