पाकिस्तानला साथ दिल्यानंतर मार्बल व्यापा-यांनी देखील तूर्कीएवर बहिष्कार टाकला आहे. व्यापा-यांनी टाकलेल्या बहिष्कारानंतर आता तूर्कीएमधून मार्बल भारतात येणार नाही. त्यामुळे तूर्कीएला याचा मोठा फटका बसणार आहे. राजस्थानच्या उदयपूरमधील व्यापा-यांनी तूर्कीएसोबतचा व्यापार बंद केला आहे.
भारतात आयात होणाऱ्या ७०% मार्बल तुर्कीयेमधून येतोतूर्कीएसोबत व्यापार थांबवल्यानं भारतीय मार्बलची मागणी वाढेलतसंच कॅटने देशभरातील व्यावसायिकांना तुर्की आणि अझरबैजानला न जाण्याचं आवाहन केलं आहे. कारण भारतातून असंख्य पर्यटक हे तूर्कीएला जात होते. मात्र, आता तुर्कीएनं पाकिस्तानला साथ दिल्यामुळे याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील.