आता मुंबईतून नवी मुंबईत पोहचा ४० मिनिटांत, कसे? घ्या जाणून

नवी मुंबई विमानतळ येत्या जुलै महिन्यात लोकार्पण होण्याची शक्यता आहे. मात्र त्यानंतर मुंबई ते नवी मुंबई या दोन शहरातील अंतर ४० मिनिटात पूर्ण करता येणार आहे. विमानतळापर्यंतचा मार्ग सुकर होण्यासाठी वॉटर टॅक्सीचा पर्याय आखण्यात येत आहे. याविषयीचा प्रस्ताव मत्स्य विभागाकडे असून यासाठी आवश्यक ठिकाणी जेट्टी उभारण्यात येणार आहे.

पर्यटकांना वॉटर टॅक्सीचा पर्याय उपलब्ध झाल्यानंतर पर्यावरणपुरक प्रवासाचा लाभ घेता येणार आहे. मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी यासंदर्भात बैठक घेतली होती. या बैठकीत वॉटर टॅक्सी सुरू करण्यासाठी टर्मिनल उभारणी टप्या टप्प्याने सुरू करावी. तसेच यासाठी विमानतळ प्राधिकरणाने आवश्यक परवानग्यांसाठी प्रस्ताव सादर करावेत. माल वाहतुकीसाठीही जेट्टी उभारण्यासाठी ठिकाणे निश्चित करावीत, अशा सूचना त्यांनी केल्या आहेत.

या वॉटर टॅक्सी सेवांमध्ये इलेट्रिक बोटींचा वापराामुळे प्रदूषण कमी होईल तसेच मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होईल, असे नितेश राणे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here