मुंब्रा रेल्वे दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. दुर्घटनेवर आयसीएफ बैठकीत रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली. त्यानुसार लोकलचं सर्व रुपडंच बदललं जाणार आहे. नव्या ट्रेन नोव्हेंबर २०२५ पर्यंत तयार होणार आहेत. तसंच जानेवारी २०२६ पासून या नव्या ट्रेन सेवेत येतील. मुंबईमधील मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या दुर्घटनेत ४ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
आयसीएफ बैठकीत रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांची चर्चा झाली असून, नॉन-एसी लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजांचा उपाय काढण्यात आला आहे. वेंटीलेशनसाठी फ्लॅप लावणार असल्याची माहिती आहे. तसंच छपराकडेही वेंटीलेशन युनिट लावलं जाणार आहे. कोटमध्येही वेस्टिब्युल लावणार असून, एका कोचमधून दुसऱ्या कोचमध्ये जाण्याची सोय केली जाईल.