राज-उद्धव मेळाव्यावर नितेश राणेंचा खोचक सवाल! अंतरपाट दूर झाला तर नवरा नवरी कोण?

नितेश राणे यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या वरळी डोम येथे आयोजित विजयी मेळाव्यावर टीका केली. ठाकरे बंधुंचा हा मेळावा म्हणजे जिहादी सभा असल्याचा आरोप नितेश राणेंनी केला. टोपी-दाढीवाल्यांकडून मराठी बोलायला लावण्याची हिंमत आहे का? असा प्रश्न त्यांनी विचारला. हा मेळावा हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठी आहे, असा टोला लगावला. नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख जिहादी हृदयसम्राट असा करत त्यांच्यावर टीका केली. राज-उद्धव यांच्या एकत्र येण्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर फरक पडणार नाही, असेही त्यांनी यावेळी म्हटले.

आपल्यातला अंतरपाट दूर झाला असं विधान उद्धव ठाकरेंनी केलं होतं. त्यांच्या या विधानाचा नितेश राणे यांनी समाचार घेतला. अंतरपाट दूर झाला असं उद्धव ठाकरे म्हणतात मात्र यापैकी नवरा कोण आणि नवरी कोण? हे विचारायला हवं असा टोला नितेश राणेंनी लगावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here