केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसईच्या शाळांच्या) अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैदीप्यमान इतिहासाचा समावेश करण्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केली असली, तरी सध्याच्या अभ्यासक्रमात शिवाजी महाराजांविषयी एक धडा आणि तोसुद्धा फक्त ६८ शब्दांमध्ये समाविष्ट करण्यात आला असून, हे धक्कादायक वास्तव नुकतंच समोर आलं आहे.
सीबीएसईच्या देशपातळीवर शिकवल्या जाणाऱ्या इयत्ता चौथी ते बारावीपर्यंतच्या इतिहासाच्या पुस्तकांची एकूण पानं आहेत २२००. या सव्वादोन हजार पानांपैकी मराठ्यांच्या इतिहासाला फक्त दोन पानांचंच महत्त्वं देत तो अक्षरशः गुंडाळून टाकण्यात आला आहे.
सीबीएसईच्या पाठ्युपुस्तकांत महाराजांच्या आणि मराठ्यांच्या इतिसाहाला मिळालेली जागा पाहता या विरोधात मराठा संघटना आणि शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत. ज्या विरोधात गुरुवारी पत्रकार परिषद घेत तिथं यासंदर्भातील सविस्तर भूमिका मांडण्यात येणार आहे.