दुपारची झोप घातक की फायदेशीर?

सतर्कता वाढवण्यासाठी, मनःस्थिती सुधारण्यासाठी, स्मरणशक्ती मजबूत करण्यासाठी व उत्पादकता सुधारण्यासाठी दुपारी काही वेळ डुलकी घेणे खूप फायदेशीर मानले जाते. परंतु, ही दुपारची डुलकी काहींसाठी रात्रीची झोप खराब करू शकते. खरं तर, डुलकी घेणे ही दुधारी तलवार आहे. झोप योग्य रीत्या घेतली, तर मेंदूला रिचार्ज करण्याचा, एकाग्रता सुधारण्याचा आणि मानसिक व शारीरिक आरोग्याला आधार देण्याचा तो एक शक्तिशाली मार्ग आहे. पण, याच बाबीचा चुकीच्या रीतीने वापर केल्यास तुम्हाला ती थकवा, दिशाहीन करण्यास आणि नंतर पुन्हा झोप येणे त्रासदायक ठरू शकते.

बहुतेक लोकांना दुपारी साधारणपणे दुपारी १ ते ४ च्या दरम्यान झोपावेसे वाटते. हे केवळ जेवणामुळेच होत नाही, तर त्यामागे आपली अंतर्गत सर्कॅडियन लय, दिवसभराचे जागरण आणि थकवा यावर आपले हे दिनचक्र तयार होते. दुपारची शांतता या लयीचा एक भाग आहे आणि म्हणूनच त्या वेळी बरेच लोक झोपतात.

अभ्यासातून असे दिसून आले आहे की, या काळातील एक छोटीशी डुलकी रात्रीच्या झोपेत व्यत्यय न आणता थकवा कमी करण्यास, सतर्कता वाढविण्यास व संज्ञानात्मक कार्य सुधारण्यास मदत करू शकते. ही ‘पॉवर नॅप्स’ मेंदूला गाढ झोपेत न जाता विश्रांती घेण्यास मदत करतात. परंतु, यात एक अडचण आहे आणि ती म्हणजे जास्त वेळ झोपल्याने जागे होताना पूर्वीपेक्षा जास्त वाईट वाटू शकते. एकदा ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ झोप लागली की, मेंदू मंद गतीच्या झोपेत बदलतो, ज्यामुळे जागे होणे खूप कठीण होते. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, गाढ झोपेतून जागे झाल्यामुळे लोकांना एक तासापर्यंत आळस वाटू शकतो. उदाहरणार्थ, जर ते सुरक्षिततेसाठी महत्त्वाची कामे करण्याचा, महत्त्वाचे निर्णय घेण्याचा किंवा यंत्रसामग्री चालवण्याचा प्रयत्न करीत असतील, तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात आणि जर दिवसा खूप उशिरा झोप घेतली, तर रात्री झोप लागण्यात समस्या निर्माण होऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here