राज ठाकरेंनी पालिका निवडणुकीच्या दृष्टीकोनातून तयारी सुरु केली आहे. काम न करणाऱ्यांना थेट पक्षातून काढून टाकण्याचा आदेश त्यांनी दिला आहे. मनसेकडून मुंबईत संघटनेत मोठे फेरबदल होणार आहेत. काम न करणाऱ्या विभाग अध्यक्षांना तसंच शाखाध्यक्षांना नारळ देण्यात येण्याची शक्यता आहे. २४ जूनला याबाबतीत सविस्तर अहवाल राज ठाकरेंना देण्यात येणार आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात फेरबदल आणि नवीन नेमणूका जाहीर होतील.
मुंबई महापालिकेच्या दृष्टीने राज ठाकरे आक्रमक झाले आहेत. काम न करणाऱ्यांना काढून टाका व तात्काळ पर्यायासह २४ जूनला अहवाल सादर करा असा आदेश त्यांनी केंद्रीय समित्यांना दिला आहे. मनसेत अनेक विभागात पर्याय शोधणे सुरू आहे.