राज ठाकरे यांचं मुख्याध्यापकांना पत्र! जाणून घ्या पत्राचा विषय काय?

राज्यातील शाळांमध्ये तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती करण्याचा निर्णय अद्यापही मागे न घेतल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्याध्यापकांना पत्र लिहिलं आहे. या पत्रातून त्यांनी मुख्याध्यापकांना सरकारला हिंदी भाषेसंदर्भात सहकार्य करु नका असं आवाहन केलं आहे. जर विद्यार्थ्यांवर भाषा लादली तर मनसैनिक चर्चेसाठी येतील असा इशाराही दिला आहे. तुम्ही ठाम राहिलात तर आम्ही तुमच्या पाठीशी उभी राहू असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे.

राज ठाकरेंनी शाळेच्या मुख्याध्यापकांना लिहिलेलं पत्र सोशल मीडियावर शेअर केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here