ज्या ताटात खायचं त्या ताटात ओकायचं…. भरत गोगावलेंवर ठाकरे गटाची टीका

भरत गोगावले शिवसेनेतील पक्षातील बंडासाठी रश्मी ठाकरे यांना जबाबदार धरलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी रश्मी ठाकरेंवर केलेल्या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे. शिवसेनेत जे घडलं त्याला रश्मी ठाकरेच कारणीभूत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्री पद असो वा आदित्य ठाकरेंना मिळालेले मंत्रिपद असो, हे सर्व निर्णय रश्मी ठाकरेंच्या सांगण्यावरुनच झाले, असा दावा त्यांनी केला आहे. यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पोळ पाटील यांनी भरत गोगावलेंवर टीका केली आहे.

“ज्या ताटात खायचं त्याच ताटात ओकायचं अशी आमच्या मराठवाड्यात म्हण आहे. म्हणीप्रमाणेच भरत गोगावले ओकत आहेत. ज्या रश्मीताईंचा राजकारणाराशी काही संबंध नाही त्यांच्यावर तोंडसुख घेऊन पालकमंत्रीपद आपल्या पदरात पडतंय का यासाठी हा केविलवाणा प्रयत्न आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्यावर भुंकून झालं, पण पदरात निराशाच पडत आहे. याच नैराश्यातून हे विधान केली जात आहे,” अशी टीका त्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here