समृद्धी महामार्गाने टोलच्या माध्यमातून महाराष्ट्राला केले मालामाल!

राज्यातील समृद्धी महामार्ग हा एक विशेष असा महामार्ग ठरत आहे. या महामार्गामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळत आहे. समृद्धी महामार्ग हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी असा प्रकल्प आहे. नागपूर ते मुंबई हा 701 किलोमीटरचा समृद्धी महामार्ग आहे. कुंभमेळ्याला गेलेल्या भाविकांनी समृद्धी महामार्गाचा वापर केल्यामुळे वाहनांच्या संख्येत वाढ झाली. फेब्रुवारी महिन्यात टोलच्या माध्यमातून सुमारे 72 कोटी रूपयांचे उत्पन्न राज्य रस्ते विकास महामंडळाला मिळाले आहे. समृद्धी महामार्गाने टोलच्या माध्यमातून महाराष्ट्राला मालामाल केले आहे.

2019 मध्ये महामार्गाच्या कामाला सुरूवात झाली होती. आता या महामार्गाचे 100 टक्के काम पूर्ण झाले आहे. महिनाभरात हा महामार्ग सर्वांसाठी खुला होणार आहे. फेब्रुवारीमध्ये या महामार्गावरून तब्बल 10 लाख वाहनांनी प्रवास केला. यामधून सरकारला 72 कोटी रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. समृद्धी महामार्ग पाडव्याच्या आधी सर्वांसाठी खुला होणार आहे. 701 किमी लांबीचा हा महामार्ग महाराष्ट्राच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी महत्त्वपूर्ण आणि गेमचेंजर ठरणार आहे.

गुढी पाडव्याला समृद्धी महामार्ग प्रवासासाठी 100 टक्के खुला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या नागपूर ते इगतपुरी यादरम्यान हा एक्सप्रेस वे सुरू आहे. अखेरचे 76 किमीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. नागपूर-मुंबई समुद्धी महामार्गावरून फेब्रुवारी महिन्यात तब्बल 10 लाख वाहनांनी प्रवास केला. आतापर्यंतची ही सर्वाधिक वाहन संख्या आहे. आता येत्या महिन्याभरात इगतपुरी ते आमने हा उर्वरित 76 किलोमीटरचा मार्ग सुरु होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच टोलवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. समृद्धी महामार्गावर 19 टक्के दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे समृद्धी महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्याची झळ बसणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here