औरंगजेब हा लुटारु होता, त्याचं कुटुंब लुटारु होतं. भारत लुटायला तो आणि त्याचं खानदान चालून आलं होतं. त्याचा आदर्श आपल्यापुढे कसा ठेवायचा? आमचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहेत असं योगगुरु बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे. नागपुरात पतंजलीच्या फूड पार्कच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
दरम्यान नागपूरच्या कार्यक्रमात रामदेवबाबांनी औरंगजेब आमचा आदर्श असूच शकत नाही असं म्हटलं आहे. “औरंगजेब भारताचा आदर्श असूच शकत नाही, तो क्रूर होता. औरंगजेब लुटारु होता. त्याचं कुटुंब लुटारु होतं. बाबर काही भारतात काही घडवायला आला नव्हता. बाबर, अकबर, औरंगजेब त्यांची मुलं या सगळ्यांनी हरम तयार केले. आपल्या हजारो आया-बहिणींची त्यांनी बेअब्रू केली. आपल्या देशाची ओळख पुसण्याचा प्रयत्न त्यांनी केला. अशी माणसं आपला आदर्श असूच शकत नाहीत. आपला सगळ्यांचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहेत.” असा योगगुरु बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे.