पश्चिम बंगालमध्ये वक्फ सुधारणा विधेयक लागू होणार नाही… ममता बॅनर्जी यांचा आक्रमक पवित्रा

देशामध्ये सध्या वक्फ बोर्डवरुन राजकारण रंगले आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक मंजूर झाले आहे. विधेयकाच्या बाजूने लोकसभेमध्ये २८८ तर विरोधात २३२ मते पडली आहेत. तर राज्यसभेमध्ये देखील हे विधेयक मंजूर झाल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील स्वाक्षरी केली आहे.

दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. पश्चिम बंगालमध्ये ते लागू करणार नाही असा पवित्रा ममता बॅनर्जी यांनी घेतला आहे. तृणमृल कॉंग्रेसने यापूर्वी देखील वक्फ बोर्डाच्या विरोधामध्ये भूमिका घेतली होती. राष्ट्रपतींनी विधेयकावर स्वाक्षरी केल्यानंतर देखील ममता बॅनर्जी या आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. ममता बॅनर्जी यांनी एका भाषणादरम्यान, वक्फ सुधारणा विधेयकाबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच त्यांनी ही पश्चिम बंगाल सरकारची ठाम भूमिका असल्याचे देखील म्हटले आहे.

भाषणामध्ये बोलताना ममता बॅनर्जी यांनी वक्फ बोर्ड विधेयकाबाबत मत व्यक्त केले. ते म्हणाले की, “मला कल्पना आहे की वक्फ सुधारणा विधेयक संसदेत मंजूर झाल्यामुळे तुमच्या मनात असंतोष आहे. पण बंगालमध्ये असं काहीही घडणार नाही. राजकीय चळवळीसाठी काही लोक तुम्हाला भडकवण्याचा प्रयत्न करत असतील, पण त्यांच्या भडकवण्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा. याप्रकारे फोडा आणि राज्य करा धोरणातून एखादी व्यक्ती सत्ता गाजवेल त्यावेळी सगळ्यांनी एकत्र राहायला हवंय, असा संदेश तुम्ही द्या”असे मत ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केले. मुर्शिदाबादमध्ये वक्फ विधेयकावरून हिंसाचार झाल्याने त्यांनी निषेध व्यक्त केला. पुढे त्यांनी पश्चिम बंगालमधील नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. त्या म्हणाल्या की, “काही लोक तुम्हाला रस्त्यावर उतरण्यासाठी भडकवण्याचा प्रयत्न करतील. पण तुम्ही असं काही करू नका असं माझे तुम्हाला आवाहन आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here