भारत-पाकिस्तान संबंध आणि युद्धविषय अभ्यासकांच्या अंदाजानुसार, भारताने पाकिस्तानसारख्या देशाविरुद्ध युद्ध करण्याचा निर्णय घेतला तर प्रती दिवस भारताला 1460 कोटी रुपये ते 5 हजार कोटी रुपयांपर्यंतचं नुकसान होऊ शकतं. युद्धाचा कालावधी लांबत गेला तर भारताला प्रती दिवस 1.34 लाख कोटी रुपयांपर्यंतचा खर्च येऊ शकतो. तसेच परदेशी गुंतवणूकदार पाठ फिरवण्याची शक्यताही नाकारता येत नाही. परदेशी चलन मोठ्या प्रमाणात खर्च होईल. डॉलर्सच्या तुलनेत रुपयाचं मूल्य कमी होईल, या साऱ्याचा मोठा आर्थिक परिणाम होण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानची अर्थव्यवस्था अधीच कमकुवत झालेली आहे. एका मोठ्या युद्धामुळे पाकिस्तानी अर्थव्यवस्था उद्धवस्त होईल. पाकिस्तानी रुपया एका डॉलरच्या तुलनेत 285 रुपयांपर्यंत पडू शकतो. पाकिस्तानमधील परकीय चलन मोठ्या प्रमाणात युद्धासाठी खर्च करावं लागेल, असाही अंदाज आहे. पाकिस्तानच्या कृषी क्षेत्रावर युद्धाचा मोठा परिणाम होईल. पाकिस्तानमधील कृषी क्षेत्र हे त्यांच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे.भारत आणि पाकिस्तानमधील व्यापार आधीच ठप्प झालेला आहे. युद्ध झालं तर हा व्यापार दिर्घकाळ बंद राहू शकतो. भारत पाकिस्तानला 1.2 बिलीयन अमेरिकी डॉलर्सच्या किंमती इतका माला निर्णय करतो. यामध्ये प्रामुख्याने औषधं, रसायने आणि शेतीसंदर्भातील उत्पन्नांचा समावेश आहे.