भारत पाकिस्तान संघर्षावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलं देशवासीयांना आवाहन

भारत आणि पाकिस्तान या युद्ध संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भारतीय जनता पार्टीची मातृक संस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने एक निवेदन जारी केलं आहे. सरसंघचालक मोहन भागवत आणि संघाचे सरचिटणीस दत्तात्रेय होसाबळे यांच्या नावाने संघाने पत्रक जारी करत आपली भूमिका मांडली आहे.

“पहलगाममधील भ्याड दहशतवादी घटनेनंतर पाक पुरस्कृत दहशतवाद्यांवर आणि त्यांच्या समर्थक परिसंस्थेवर ‘ऑपरेशन सिंदूर’ ही निर्णायक कारवाई केल्याबद्दल भारत सरकार आणि सशस्त्र दलांच्या नेतृत्वाचे हार्दिक अभिनंदन. हिंदू यात्रेकरूंच्या क्रूर हत्याकांडातील पीडित कुटुंबांना आणि संपूर्ण देशाला न्याय मिळवून देण्यासाठी करण्यात येणाऱ्या या कारवाईमुळे संपूर्ण देशाचा स्वाभिमान आणि धैर्य वाढले आहे,” असं संघाने म्हटलं आहे.

“या आव्हानात्मक प्रसंगी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सर्व देशवासीयांना सरकार आणि प्रशासनाने दिलेल्या सर्व माहितीचे पूर्ण पालन करण्याचे आवाहन करतो. यासोबतच, या प्रसंगी, आपले नागरी कर्तव्य बजावताना, सामाजिक एकता आणि सौहार्द बिघडवण्याचे देशविरोधी शक्तींचे कोणतेही षड्यंत्र यशस्वी होऊ देणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. सर्व देशवासीयांना विनंती आहे की त्यांनी आपली देशभक्ती प्रदर्शित करावी आणि आवश्यकतेनुसार सैन्य आणि नागरी प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार राहावे आणि राष्ट्रीय एकता आणि सुरक्षा राखण्यासाठी सर्व प्रयत्नांना बळकटी द्यावी,” असं आवाहन संघाने सर्व भारतीयांना केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here