मुंब्रा दुर्घटनेनंतर आता कुर्ला कारशेडमध्ये साध्या लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजा असलेला एक डबा तयार केला आहे. त्यामुळे मुंबईकरांचा लोकलच्या दरवाज्यात उभे राहत जीवघेणा प्रवास टळणार आहे.
नागरिकांचा गर्दीतील जीवघेणा प्रवास जरी टळणार असला तरी गर्दीच्या वेळी हवा खेळती राहण्यासाठी, वायूविजन, विशेष अशी कोणतीही व्यवस्था या डब्यात नसल्याचे दिसून येते. त्यामुळे साध्या लोकलमध्ये सुरक्षितता वाढणार असली तरी हवा खेळती राहण्यासाठी काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.