विमान दुर्घटना का घडली? तज्ज्ञांनी सांगितलं कारण

अहमदाबादहून लंडनमधील गॅटविक विमानतळावर जाणारे एअर इंडियाचे विमान १७१ गुरुवारी दुपारी १.३० वाजता उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच कोसळले. पक्षी धडकल्याने विमान टेक ऑफनंतर अपेक्षित वेग पकडू शकलं नसावं, ज्यामुळे दुर्घटना झाली असावी असं मत तज्ज्ञांनी मांडलं आहे.

माजी वरिष्ठ पायलट कॅप्टन सौरभ भटनागर यांनी सांगितलं की, “प्रथमदर्शनी असं दिसतं आहे की, अनेक पक्षांची धडक झाल्याने दोन्ही इंजिन बंद पडले असावेत. माझ्या मते, टेकऑफ योग्य दिसत होतं. पण गियर वर न घेताच विमान खाली उतरू लागले, जे फक्त इंजिनची पॉवर गेली किंवा विमान वर उड्डाण करण्यात अयशस्वी होताना होतं. अर्थात, तपासात नेमकं कारण उघड होईल.”

“फुटेजवरून असं दिसतं आहे की, टेकऑफ अचानक झाला. विमान नियंत्रित पद्धतीने खाली आले. पायलटने मेडे कॉल दिला होता, याचा अर्थ ती एक आपातकालीन परिस्थिती होती,” असं त्यांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here