चुकलो नसलो तरी माफी मागतो असे म्हणत वादग्रस्त वक्तव्याबद्दल लोणीकरांनी शेतकऱ्यांची आखडती माफी मागितली आहे. शेतकऱ्यांचा बाप काढल्याने बबनराव लोणीकरांवर राज्यभरातून टीका होऊ लागली होती.
भाजपचे जालन्यातील परतुरचे आमदार बबनराव लोणीकर यांनी काल सोशल मीडियावरून टिका करणाऱ्या तरुणांबद्दल वादग्रस्त वकव्य केलं. या वक्तव्याबद्दल चुकीचं बोललो नसलो तरी शेतकऱ्यांची माफी मागतो अशा शब्दात लोणीकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. भाजपचे आमदार बबनराव लोणीकरांनी शेतक-यांचा बाप काढला. जालन्याच्या परतूरमध्ये टीकाकारांवर बोलताना लोणीकरांची मग्रुरी पाहायला मिळाली. तुमच्या अंगावरचे कपडे, पायातले बूट, हातातला मोबाईल मोदी सरकारमुळेच असल्याची मुक्ताफळं लोणीकरांनी उधळली आहेत.
बबनराव लोणीकरांनी केलेल्या विधानानंतर देवेंद्र फडणवीसांनी त्यांना खडसावलंय. शेतक-यांबाबत अशा प्रकारचं विधान करण्याचा अधिकार कोणालाही नसल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय. तर बबनराव लोणीकरांनी शेतक-यांबाबत केलेल्या विधानानंतर आता विरोधक देखील आक्रमक झाले आहेत. सरकार शेतक-यांसाठी ज्या योजना राबवतं त्या जनतेनं दिलेल्या टॅक्समधून राबवल्या जातात. तसंच लोणीकरांनी केलेलं विधान गलिच्छ असल्याचं म्हणत सुळेंनी त्यांच्यावर सडकून टीका केलीय.