अहमदाबाद विमान दुर्घटनेसंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. त्यानुसार, विमानाच्या वैमानिकाने दुर्घटनेच्या आधी एटीसीला सिग्नल पाठवला होता. त्याने आगामी दुर्घटनेची भीती व्यक्त केली आणि काही वेळातच विमान दुर्घटनाग्रस्त झालं.
डीजीसीएच्या वतीने विमान दुर्घटनेसंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. त्यानुसार १३ जून २०२५ रोजी एअर इंडियाचं विमान B727 अहमदाबाद येथून गॅटिवक (AI-171)ला निघालं होतं. टेकऑफ करताच विमान दुर्घटनाग्रस्त झालं. विमानात एकूण २४२ प्रवासी होते, ज्यामध्ये २ पायलट आणि १० क्रू मेम्बर होते. कॅप्टन सुमित साभरवाल वैमानिक होते आणि त्यांच्यासह फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर होते. सुमित यांना ८२००तास विमान उड्डाणाचा अनुभव होता, तर क्लाइव्ह यांचा अनुभव ११०० फ्लाइट अवर्स होता.
सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे, अहमदाबाद विमानतळावरच्या रनवे २३ हून या विमानाने १.३९ वाजता उड्डाण केलं होंत. उड्डाण करताना वैमानिकाने जवळच्या एटीसीला Mayday चा कॉल दिला होता. पण यानंतर विमानाकडून एटीसीला कोणताही सिग्नल देण्यात आला नाही. पुढील काही सेकंदात विमान दुर्घटनाग्रस्त झालं.
Mayday या शब्दाचा वापर आपतकालीन परिस्थितीत केला जातो. आपातकालीन परिस्थितीत पायलट Mayday हा शब्द तीन वेळा बोलतात. यामुळं क्रू मेंबर्स अलर्ट होतात. पायलटकडून या शब्दांचा वापर नेहमी नाही केला जात. Mayday या शब्दांचा वापर फक्त आपातकालीन स्थितीत केला जातो. आता तुम्ही विचार कराल की या कोडवर्डचा वापर करण्याऐवजी पायलट थेट का बोलत नाहीत. कारण विमानात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना धोक्याची सूचना मिळाली तर ते घाबरतील आणि फ्लाइटमध्ये धावपळ निर्माण होईल. यामुळं पायलट कोड वर्डचा वापर करतात.