दुपारी भरपेट जेवणाचा आनंद घेऊन अनेकजण ताणून झोप काढतो. आपल्यापैकी काहीजण रोज दुपारी वामकुक्षी घेतात. पण आता तुम्हाला सावध करणारी बातमी आहे. दिवसा झोपल्याने तुमच्या आरोग्याला मोठी हानी पोहोचू शकते. काय होऊ शकतं दुपारी झोपल्याने.
दिवसा झोपेबाबत आंतरराष्ट्रीय परिषदेत एक अहवाल सादर करण्यात आला. या अहवालात काही धक्कादायक दावे करण्यात आलेत. यानुसार जे दिवसा झोपतात. त्यांच्या अकाली मृत्यूची शक्यता वाढते. याबाबत सांख्यिकी माहीतीही समोर आलीये. दिवसा झोप न घेणाऱ्यांच्या तुलनेत. दिवसा झोपणाऱ्यांच्या अकाली मृत्यूची शक्यता २० टक्के जास्त असते.
खरंतर भारतात दुपारी जेवणानंतर झोपणं, वामकुक्षी घेणं, सामान्य आहे. सहसा लोक जेवणानंतर २० ते ३० मिनिटे झोप घेतात. पण या अहवालानुसार दिवसा झोपणे, हे प्रत्यक्षात आरोग्याशी संबंधित समस्यांचे लक्षण असू शकते. दिवसा झोपल्याने, हृदयाच्या ठोक्यांच्या नैसर्गिक गतीवर परिणाम होऊ शकतो. दिवसा जास्त झोपल्याने मेंदूच्या क्षमतेवरही परिणाम होऊ शकतो. दिवसाची झोप अल्झायमर सारख्या आजाराचे कारण बनू शकते.