एअर इंडियाच्या विमानाला झाला उशीर, सुप्रिया सुळे संतापल्या! लिहीली पोस्ट अन्…

एअर इंडियाच्या विमानाला विलंब झाल्यामुळे सुप्रिया सुळे यांनी एअर इंडियाबाबत नाराजी व्यक्त करत विमानाला उशीर होणं हे कायमचंच झालं आहे. प्रवाशांना मनस्तापाला सामोर जावं लागत असून हे अस्वीकार्य आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी याकडे लक्ष देण्याची विनंती सुप्रिया सुळे यांनी केली. सुप्रिया सुळे यांनी एक्सवर याबाबत पोस्ट केलेली.

“एअर इंडियाच्या विमानांना अविरत विलंब होत आहे, हे अस्वीकार्य आहे. आम्ही प्रीमियम भाडे देतो, तरीही विमाने कधीच वेळेवर येत नाहीत. व्यावसायिक, मुले आणि ज्येष्ठ नागरिक या सर्वांनाच या सततच्या गैरव्यवस्थापनाचा फटका बसतो. नागरी विमान वाहतूक मंत्र्यांना कारवाई करण्याचे आणि एअर इंडियाला जबाबदार धरण्याचे आवाहन आहे”, असं सुप्रिया सुळे यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. तसेच त्यांनी केंद्र सरकारला एअरलाइनच्या सततच्या गैरव्यवस्थापनाच्या विरोधात त्वरित कारवाई करण्याची विनंती केली. तसेच संबंधित एअरलाइन्सना जबाबदार धरण्यासाठी कठोर नियम लागू करण्याची विनंती सुप्रिया सुळे यांनी नागरी विमान वाहतूक मंत्र्यांकडे केली आहे.

दरम्यान, या पोस्टला उत्तर देताना एअर इंडियाने म्हटलं की, “आम्हाला माहित आहे की विलंब खूप निराशाजनक असू शकतो. तथापि कधीकधी आमच्या नियंत्रणाबाहेरील ऑपरेशनल समस्या असतात, ज्या फ्लाइट वेळापत्रकावर परिणाम करू शकतात. अशा समस्येमुळे आज संध्याकाळी तुमचे मुंबईला जाणारे विमान एक तास उशिरा पोहोचले. आम्ही तुमच्या समजुतीचे कौतुक करतो”, असं एअर इंडियाने दिलेल्या उत्तरात म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here