हार जीत ही होतच असते. एकदा हारलो म्हणून खचून जाण्यात काही अर्थ नाही. राजकारणात पण असच आहे. एक निवडणूक झाली की पुढच्या निवडणुकीची तयारी करावी लागते, रणनीती ठरवावी लागते. कारण प्रत्येक राज्याची समीकरण वेगवेगळी असतात..आता दिल्लीनंतर सगळ्या पक्षांचं लक्ष आहे पश्चिम बंगाल. 2026 मध्ये पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. हरियाणा, महाराष्ट्र आणि दिल्ली एकामागून एक विजय प्राप्त केल्याने भाजपच्या अंगात आता बळ संचारलं आहे.. मध्ये बिहारच्या निवडणुका आहेत पण तिथली सगळी गणितं वेगळी आहेत.. पश्चिम बंगालवर भाजपला कमळ फुलवायचं आहे.. त्यादृष्टीने भाजपने तयारी पण सुरू केली आहे.
ते म्हणतात ना आधीच्या कामगिरीचा पुढच्या कामगिरीवर परिणाम होत असतो.. हे तीन विजय भाजपसाठी महत्त्वाचे होते.. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये सत्ता आणण्यासाठी भाजप जोरदार फील्डिंग लावणार यात काही वाद नाही.

भाजपा नेते शुभेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसला थेट इशारा दिला आहे. पश्चिम बंगाल हे पुढील राज्य असेल जिथे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा जिंकेल असे शुभेंदू अधिकारी म्हणाले आहेत. ‘दिल्ली की जीत हमारी है। अब बंगाल की बारी है’ असा इशारा त्यांनी दिला आहे.. पश्चिम बंगालमधील विरोधी पक्ष असलेला भाजप 2011 पासून सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांचे राज्य संपुष्टात आणण्याचे ध्येय ठेवून आहे. 292 जागा असलेल्या राज्याच्या विधानसभेची पुढील वर्षी निवडणूक होणार आहे. 27 वर्षांनी दिल्लीवर भाजपने झेंडा फडकवला तसा यंदा पश्चिम बंगालमध्ये पण शक्यता आहे.. भाजप सोबत संघाची ताकद असणारच त्यामुळे 2011 पासूनची प्रतीक्षा संपण्याची शक्यता आहे..
शुभेंदू अधिकारी यांनी ‘आप’वर टीका करत ममता बॅनर्जींना इशारा दिला आहे. ते म्हणाले, दिल्लीतील ‘आपत्तीचा (आप) शेवट झाला आहे आणि राष्ट्रीय राजधानीत राहणाऱ्या बंगाली लोकांनी भाजपला मतदान केले आहे. आप-दा की विदाई हो गई है’ जनतेने आप ला योग्य उत्तर दिलंय.. आता ममता दीदींची वेळ.. दिल्लीप्रमाणे आता बंगालमध्येही बदलाची वेळ आली आहे. बंगालमध्येही भाजपची लाट आहे.. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला..
तर दुसरीकडे काँग्रेसचे युवराज राहुल गांधी पश्चिम बंगालमध्ये पद यात्रेचा घाट घालणार आहेत.. राहुल गांधी आणि ममता बॅनर्जी यांच्यातून विस्तव ही जात नाही हे सर्वश्रुत आहेच.. पण राहुल गांधी बंगालमध्ये सक्रिय होत असल्याने पुन्हा एकदा ममता दीदी आणि राहुल गांधी हा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. कारण मित्रपक्ष जेव्हा एकमेकांच्या विरोधात लढतात तेव्हा ते जास्त त्वेषाने लढतात..दिल्लीत पाहिलं आपण..

लोकसभा निवडणुकीत इंडी आघाडीची गाडी भलतीच फॉर्मात होती.. काँग्रेसच्या अंगावर पण मूठभर मांस चढल होतं. काँग्रेसची गाडी पण एकदम सुसाट. पण ही सुसाट गाडी हरियाणात बंद पडली. महाराष्ट्रात तर चांगलेच धक्के बसले. गाडीची मोडतोड झाली. रडतखडत कशी तरी गाडी राहुल गांधींनी दिल्लीला आणली. पण दिल्लीत गाडी बंदच पडली. आता 5 वर्ष किंवा पुढेही दिल्लीत काही ही गाडी चालणार नाही.
आता दिल्लीत काँग्रेसने स्वतःची गाडी बंद पाडलीच पण इंडी आघाडीतील मित्र पक्ष असलेल्या आप च्या गाडीची पण मोडतोड केली. आता राहुल गांधी हिच मोडकीतोडकी गाडी घेऊन बंगालच्या दिशेने निघाले आहेत. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला आव्हान देण्यासाठी राहुल गांधींची स्वारी आता बंगालच्या दारी निघाली आहे.
पण बंगाल मध्ये ममता बॅनर्जी यांना त्रास देणं हे केजरीवालांना त्रास देण्याइतक सोपं नाही. क्रूरपणे सत्तेचा गाडा हाकणाऱ्यांमध्ये ममता दीदींचा समावेश होतो. नाव ममता असला तरी वागणुकीत कुठेही ममत्व भाव नाहीये.. मागच्या विधानसभेच्या वेळेस आपण ते पाहिलं आहेच.. भाजप कार्यकर्त्यांनी हिंसाचाराचा सामना करत 77 जागा मिळवली होत्या.. आणि इंडी आघाडी ममता दीदींना नकोशी झालीय.. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसच वर्चस्व नाही त्यामुळे युती करण्याचा प्रश्न च येत नाही असं त्या जाहीरपणे सांगतात.. त्यामुळे आम्ही स्वबळावर लढणार ही त्यांची भूमिका आहे.. काँग्रेसला त्या उभ ही करणार नाही.. अशा परिस्थितीत जर काँग्रेसने आव्हान दिलंच तर यंदा काँग्रेस कार्यकर्त्यांना हिंसाचाराचा सामना करावा लागू शकतो.. इंडी आघाडीतील मित्र पक्ष वैगेरे त्या काही बघणार नाही.. तेवढ्या क्रूर त्या आहेत..
आता अशी खबर आहे की बंगालमध्ये राहुल गांधींची पदयात्रा आयोजित केली आहे.. राज्य काँग्रेसला तसे आदेश दिले आहेत.. ममता यांच्या विरुद्ध काँग्रेसचा एकमेव योद्धा अधीर रंजन चौधरी यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्याने राज्यात पक्षाचा एकही खासदार नाही.. पण मागे राहुल गांधींची भारत जोडो यात्रा बंगालमध्ये पोहोचली तर ममता दीदींनी मुक्काम करण्यास नकार दिला.. त्यामुळे आता तर ममता दीदी काय क्रूरपणा करतील सांगता येत नाही..
ममता दीदींसाठी ही निवडणूक वाटते तितकी सोपी नाही.. काँग्रेस आणि भाजप दोन्हीच आव्हान त्यांच्या समोर आहे.. काँग्रेसने खात जरी नाही उघडल तर दिल्लीत जसा आपला फटका बसला तसा ममता दीदींना बसू शकतो.. काँग्रेसच एक आहे.. स्वतः जिंकलो काय हरलो काय काही फरक पडत नाही.. दुसऱ्याच कामात मोडता त्यांना घालता येतो.. हरियाणा, महाराष्ट्र आणि दिल्ली ही उदाहरणं आहेतच.. तसंही गांधी परिवार आता सेफ आहे.. राहुल गांधी विरोधी पक्ष नेते आहेत.. बहिण प्रियांका गांधी खासदार आहे.. आई सोनिया गांधी राज्यसभेच्या खासदार आहेत.. त्यामुळे त्यांना काही फरक पडत नाही.
पण काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांच्यातील वादाचा फायदा भाजपला होणार.. दिल्लीत भाजपने याआधी 8 जागांवरून थेट 48 जागांवर मजल मारली त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये ही भाजप 77 वरून मुसंडी मारू शकते.. ममता दीदींना सत्ता राखणं सोप नाही हे मात्र खरं… पश्चिम बंगालच्य राजकारणात अजून बऱ्याच घडामोडी घडणार आहेत.. आगे आगे देखो होता है क्या.