उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील गौरीकुंड परिसरात रविवारी सकाळी केदारनाथ धामला जात असलेलं एक हेलिकॉप्टर कोसळलं आहे. या हेलिकॉप्टरमध्ये एकूण पाच जण होते आणि पाचही जणांचा मृत्यू झाला आहे.
ही घटना रविवारी म्हणजेच १५ जुन रोजी पहाटे सुमारे ५.३० वाजता घडली असून आर्यन कंपनीचं हे हेलिकॉप्टर होतं. अपघाताचं मुख्य कारण खराब हवामान असल्याचे सांगितलं जात आहे. हे हॅलिकॉप्टर गौरीकुंड आणि त्रिजुगीनारायण मार्गात ही घटना घडली आहे. गौरीकुंडच्या वर गवत कापणाऱ्या नेपाळी वंशाच्या महिलांनी हेलिकॉप्टर अपघाताची माहिती दिली. त्यांनी माहिती देताच लगेच घटना स्थळी एनडीआरएफ आणि एसडीआरएफ टीम रवाना करण्यात आल्या.
या अपघातात मृत्यू झालेल्या लोकांचे पार्थीव जळाल्याचे म्हटले जात आहे. हेलिकॉप्टर क्रॅशची माहिती नोडल अधिकारी राहुल चौबे आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह रजवार यांनी दिली आहे.